निबंध लेखन मराठीत|Essay Writing in Marathi
1)प्रस्तावना
Essay Writing in Marathi मित्रांनो, आपण निबंध लेखन मराठीत Essay Writing in Marathiया विषयावर महत्त्वपूर्ण ब्लॉक पोस्ट लिहिणार आहे.विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मराठी भाषेतून निबंध लिहिण्यासाठी परीक्षेत प्रश्न विचारण्यात येतात.
विद्यार्थ्यांना निबंध लेखन मराठीत कौशल्य योग्य प्रकारे आत्मसात न केल्यामुळे त्याला परीक्षेत निबंध लेखन योग्य प्रकारे करण्यासाठी या ब्लॉग पोस्ट मधून विविध मुद्द्याच्या आधारे आपण संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.
निबंध लेखन ही एक कला आहेत. एक प्रकारचे निबंध लेखनाचे कौशल्यच आहे. निबंध लेखन कौशल्य प्राप्त करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना विविध विषयावर निबंध वेगवेगळ्या भाषेतून परीक्षेत लिहिण्यासाठी महत्वपूर्ण विषय देऊन त्या विषयावर आधारित निबंध लेखन ' Essay Writing in Marathi 'योग्य प्रकारे करता यावे करिता या पोस्ट मधून याबाबत या लेखात स्पष्टपणे माहिती नमूद केली आहे.
![]() |
Essay Writing in Marathi |
Essay Writing in Marathi(toc)
2)मराठीत निबंध लेखन
|Essay Writing in Marathi
परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना निबंध लेखनासाठी एक मर्यादित व्याप्तीचा किंवा ठराविक शब्दात एखाद्या विषयावर निबंध लिहिण्यासाठी विविध परीक्षेकरता निबंध लेखन लिहिण्यास सांगतात. नेमके विद्यार्थ्यांना याबाबत सुस्पष्ट माहिती त्यांनी प्राप्त न केल्यामुळे विद्यार्थ्याला निबंध लेखन करणे अवघड जाते म्हणून आपण मित्रांनो या लेखात Essay Writing in Marathiनिबंध लेखन मराठीत कसे करावे? याबाबत स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करत आहे.
3)निबंध म्हणजे काय?
Essay Writing
एखाद्या सुस्पष्ट विषयावर मर्यादित शब्द संख्येमध्ये संक्षिप्तपणे साधारणतः ठराविक लांबीचा किंवा ठराविक शब्द संख्या देऊन त्या विषयाच्या संदर्भाने महत्त्वाचे विषय आणि विषयाची क्रमबद्ध रीतीने सुसंगतवार मर्यादित व्याप्ती समोर ठेवून केलेली मांडणी म्हणजे निबंध होय. उदाहरणार्थ "माझा आवडता नेता "या विषयावर 500 शब्दात निबंध लिहा. अशा प्रकारचा विषय दिलेला असतो. परीक्षेसाठी अनेक विषयावर निबंध लेखन करणे. निबंध लेखन करणे ही एक कला आहे. ही कला आत्मसात करण्याची शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना संपादन करावी लागते. आता पूर्वीसारखे निबंध परीक्षेत विचारले जात नाही. शासनाने इयत्ता दहावी व इयत्ता बारावी या विषयाकरता कृती प्रश्नपत्रिका आराखडा धोरण आयोजित केले आहे. ज्या विषयावर निबंध लेखन करावयाचे असेल त्या विषयावर काही ठळक मुद्दे रिकाम्या जागा देऊन आठ ते दहा मुद्दे देऊन वैशिष्ट्यपूर्ण दिलेल्या मुद्द्याच्या सहाय्याने " Essay Writing in Marathi " निबंध लेखन Essay Writing करावे लागते.
4)निबंध लेखनाचे वेगवेगळे विषय
Essay Writing In Marathi Topics
मित्रांनो निबंध लेखन मराठीत करत असताना मराठी या विषयात निबंध लेखनाचे निरनिराळे किंवा वेगवेगळे विषय असतात आणि या विषयावर आधारित निबंधाचे प्रकार केलेले आहे. मराठीत निबंध लेखन करताना सर्वसामान्यपणे निबंध लेखनाचे प्रकार किंवा विषय पुढील प्रमाणे पाहू या.Essay Writing in Marathi
- वर्णनात्मक निबंध
- आत्मवृत्त निबंध
- कल्पनेवर आधारित निबंध
- तंत्रज्ञानात्मक निबंध
- विज्ञानावर आधारित निबंध
- उपदेशात्मक निबंध
- आपल्या आवडीवर आधारित निबंध
- विविध सणावर आधारित निबंध
- भारतीय व जागतिक खेळावर आधारित निबंध
- चिंतनात्मक निबंध
- शोधात्मक निबंध
उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे निबंध प्रकारावर आधारित निबंध लेखन करता येणे आवश्यक आहे.
5)निबंध लेखनाच्या पायऱ्या
Essay Writing in Marathi Steps
कोणत्याही प्रकारच्या विषयावर आधारित निबंध लिहीत असताना खालील महत्त्वाच्या पायऱ्या विचारात घेऊन निबंध लेखन करणे.Essay Writing in Marathi
१)प्रस्तावना
निबंधाच्या पहिल्या भागात प्रस्तावना करणे. दिलेल्या विषयावर आधारित मुद्दे शुद्ध प्रस्तावना आवश्यक असते. निबंधाची प्रस्तावना कमीत कमी 30 ते 50 शब्दात लिहिणे आवश्यक आहे.Essay Writing in Marathi
२)निबंधाचा आशय
आपणास दिलेल्या विषयावर आधारित निबंध लेखन करताना मुख्य विषयातील बाबी निबंधाचा आशय या स्वरूपात आपल्या शब्दात मांडणी 30 ते 50 शब्दात विषय व विषयाचा आशय स्पष्टीकरण करावा.Essay Writing in Marathi
३)निबंध लेखनाची भाषा
निबंध लेखनाची भाषा मित्रांनो अलंकारिक असावी. निबंध लिहीत असताना मराठीच्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून सर्व नियमाचे पालन करून अचूक शब्दात मुद्देसूद मांडणी करावी. याबाबत मांडणी करताना आपण एखाद्या कवितेतील निबंधाच्या आशयाने कवीच्या ओळी अवतरण चिन्ह करावे. म्हणजेच लेखक आणि कवी तसेच कवयित्री यांनी दिलेले महत्त्वाचे यमक साधणारे शब्द असतात. निबंध लेखन करताना दीर्घ आणि -हस्व या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दिलेल्या कोटेशन मुळे आपल्या निबंधाची भाषा सौंदर्यमय होते. त्यामुळे भाषा, ज्ञान ,कौशल्य आणि उपयोजन याबाबत संपूर्ण माहिती आत्मसात करून निबंध लिहिणे.Essay Writing in Marathi
उदाहरणार्थ." माझा आवडता सण दिवाळी "या विषयावर निबंध लिहिताना आपणास बालकवीच्या खालील ओळी आवश्यक निबंधात नमूद करा किंवा लिहा.
"आनंदी आनंद गडे |
इकडे तिकडे चोवीकडे|"
काही निबंधामध्ये आपणास खालील कवितेच्या ओळी सुद्धा नमूद करता येईल.
"श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे"
"भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली."
अशा प्रकारची वाड:मय युक्त भाषा निबंधात वापरणे आवश्यक आहे.
4)निबंधातील मध्यवर्ती कल्पना.
निबंधाच्या या पायरीमध्ये किंवा स्टेप मध्ये आपणास ज्या विषयावर निबंध लेखन करावयाचा आहे त्या विषयात जे महत्त्वपूर्ण मुद्दे निबंधात मांडणे आवश्यक आहे ते मध्यवर्ती कल्पनेचा एक भाग आहे. निबंधाची मध्यवर्ती कल्पना ही पायरी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.Essay Writing in Marathi निबंधाच्या मध्यवर्ती कल्पनेमध्ये कमीत कमी पाच मुद्द्याचे स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे.
5)निबंधाचा विषय
- निबंधावर आधारित असणाऱ्या कल्पना
- विषयाची आवश्यकता
- विषयाची व्याप्ती
- विषयाची मर्यादा
हे मुद्दे विचारात घेऊन निबंधाचे लेखन करावे. ही माहिती कमीत कमी 50 ते 80 शब्दात जास्तीत जास्त 100 शब्द पर्यंत लिहिणे आवश्यक आहे.
6) निबंधाचा समारोप.
निबंध लेखन करताना ही शेवटची स्टेप किंवा पायरी आहेत यामध्ये आपणास आपण लिहिलेल्या निबंधावर आधारित निबंधाचा समारोप सारांश रूपाने लिहिणे. निबंधात दिलेले सर्व मुद्दे व त्या आधारे लिहिलेले निबंधाचे विश्लेषण करून निबंधाची नखशिखांत माहिती सारांश मध्ये स्पष्टपणे दिसून आली पाहिजे किंवा लिहिली पाहिजे.
7)निबंध लेखनाबाबत सखोल विचार
Essay Writing
निबंध लिहीत असताना आपणास निबंध लिहिण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी निबंधाची व्याख्या , निबंधाचे प्रकार ,उपयोजन, निबंधाची व्याप्ती, निबंधाचा विषय, निबंध बाबत आवश्यक असणारा ऐतिहासिक आढावा, निबंध लेखन करण्याची शैली युक्त पद्धत, निबंधासाठी दृष्टांत युक्त माहिती त्याच बरोबर तुलना आणि विरोधाभास या सर्व कल्पना विचारात घेऊन निबंधाचे कारण त्याच बरोबर त्या कारणातून उद्भवणारे परिणाम निबंधाचे वर्गीकरण आणि स्पष्टीकरण याबाबत आपण आपला विचाराचा आशय युक्तिवाद आणि तर्क ह्या सर्व गोष्टी म्हणजेच मुद्दे येणे आवश्यक आहे. निबंध लेखन करण्याची आवड असणाऱ्यांना वरील सर्व संकल्पना स्पष्टपणे या ब्लॉग पोस्ट मधून नमूद करण्यात आल्या आहे.Essay Writing in Marathi
8)स्पर्धा परीक्षेकरिता निबंध लेखन
Essay Writing in Marathi
विविध विभागामार्फत स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. शिष्यवृत्ती परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा आणि शासन स्तरावरून आयोजित करण्यात आलेल्या शोधनिबंध याबाबत आपणास निबंध लेखन कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्यामुळे आपण या पोस्ट मधून थोडक्यात कमीत कमी शब्दात निबंध लेखन मराठीत Essay Writing in Marathiकरत आहोत परंतु मित्रांनो लक्षात असू द्या की, स्पर्धा परीक्षेसाठी निबंध शोधात्मक कल्पनेवर आधारित म्हणजेच नवोपक्रम किंवा कृती संशोधन या विषयावर शोधनिबंध विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत त्यामुळे आपणास निबंध लिहिण्यास सुरुवात केल्यापासून शेवटच्या घटकापर्यंत येत असताना निष्कर्षापर्यंत येऊन निबंध मध्ये आपण जे गृहीत मुद्दे धरले होते त्याचे वर्गीकरण व साधनसामुग्री चा विचार करून निष्कर्ष प्रत येऊन पोहोचावे लागते म्हणूनच निबंधाचा महत्त्वाचा भाग म्हणजे निष्कर्ष पण आहेत.
9)निष्कर्ष युक्त मुद्देसूद मांडणी
अनेक प्रकारच्या निबंधामध्ये निबंध लेखन करताना आपणास त्या निबंधातून निष्कर्ष शोधून काढावे लागतात. जसे गणितामध्ये प्रमेय असते आणि ते प्रमेय सिद्ध करण्यासाठी गृहीत कल्पना धरून साध्य करून प्रमयाची सिद्धता लिहिली जाते. त्याचप्रमाणे आजच्या तंत्रयुगामध्ये निष्कर्षावर आधारित अनेक प्रकारचे निबंध स्पर्धा परीक्षेसाठी देण्यात येतात. उदाहरणार्थ सोशल मीडिया मार्फत प्रत्यक्ष जीवनावर काय परिणाम होत आहे? म्हणजेच "सोशल मीडियाचे परिणाम"अशा स्वरूपाच्या मुद्द्यावर आधारित जर निबंध लेखन आपण करत असाल तर सोशल मीडियाचे निष्कर्ष पर्यंत आपणास निबंध लेखन करून निष्कर्ष मांडावे लागतात.Essay Writing in Marathi
10)मराठी विषयाचा एक महत्त्वपूर्ण भाग निबंध मराठीत
marathi essay
जगातील कोणती भाषा घ्या त्या भाषेमध्ये निबंध येतोच. आपली भाषा मातृभाषा असल्यामुळे आणि आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे निबंध लेखन मराठीत करताना निबंध लेखन हा एक भाषा लेखनातील महत्त्वाचा प्रकार आहे. भाषेमध्ये जे जे कौशल्य दिलेले असतात त्या त्या कौशल्यापैकी निबंध लेखन कौशल्य ही बाब लक्षात घेऊन निबंध लेखन करणे आणि शिकणे आवश्यक आहे.Essay Writing in Marathi
11)निबंध लेखन मराठीत निष्कर्ष
Essay Writing in Marathi
निबंध लेखन करताना खालील निष्कर्ष निबंधातून वाचकाला स्पष्टपणे दिसून येणे आवश्यक आहे.
- मराठी मातृभाषेत निबंध लेखन करताना महत्त्वपूर्ण निष्कर्ष लक्षात घेतले पाहिजे.
- निबंधाचा आशय तंत्रशुद्ध हा एक निष्कर्ष आहे.
- निबंधातून केलेली विषय मांडणी
- निबंधातील अलंकारिक भाषा
- निबंधाच्या स्टेप
- निबंधाचा समारोप
12)सारांश
मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषय विचारात घेऊन त्या विषयाबाबत स्पष्टीकरण आपल्या या ब्लॉग पोस्ट मधून करण्यात आले आहेत. जे स्पष्टीकरण करण्यात आले आहे ते स्पष्टीकरण असे आहे की, आपल्या मातृभाषेत मराठी भाषेत मायबोलीत निबंध लिहीत असताना कोणत्या पद्धतीने आणि कसा निबंध लिहिणे आवश्यक आहे. निबंधातून कोणती कल्पना आणि मानवाच्या महत्त्वाच्या ज्ञान ,आकलन, उपयोजन, समायोजन आणि कौशल्य व उपयोगिता या संपूर्ण कौशल्यावर आधारित निबंध हा एक भाषा कौशल्य ज्ञानावर आधारित निबंध असतो. परीक्षेमध्ये कोणत्या विषयावर निबंध येणार आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे काळाची गरज आहे. सहसा निबंध हा वर्ग पातळी आणि वयोगट यावर आधारित निबंध विचारले जातात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या चालू घडामोडी वर आधारित निबंध परीक्षेत विचारले जातात. उदाहरणार्थ
खालीलपैकी कोणत्याही विषयावर 500 शब्दात निबंध लिहा.
१) आज शिवाजी राजे असते तर
२) दूरदर्शन शाप की वरदान
३) मी पाहिलेला किल्ला
४) पडक्या देवळाचे आत्मवृत्त
५) माझा आवडता ऋतू
अशा स्वरूपाचे निबंध निर्णया प्रकारावर आधारित विचारण्यात आलेले असतात आणि यापैकी फक्त एक विषयावर 500 शब्दात निबंध लेखन करणे आवश्यक असल्यामुळे आपण या ब्लॉग पोस्टमध्ये नखशीकांत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहेत
FAQ
१) मराठी निबंध लेखन कसे करावे?
निबंधाचा प्रकार ओळखून निबंधात दिलेल्या पाच विभागाचा सखोल चिंतनात्मक अभ्यास करून निबंध लिहिणे.
२) निबंध म्हणजे काय?
मर्यादित शब्दात आपल्या विचाराची एखाद्या विषयावर मर्यादित व्याप्ती लक्षात घेऊन कृतीयुक्त आराखडा म्हणजे निबंध होय.
३) निबंधाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात?
निबंधाला इंग्रजी मध्ये एसे (Essay )असे म्हणतात.
४) शोधनिबंध कोणत्या उपक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे?
कृती संशोधन .
५) आत्मवृत्त पर एका निबंधाचे नाव सांगा?
वृक्ष बोलू लागले तर..
मित्रांनो ,अधिक माहितीसाठी आपण आमचे खाली लेख आवश्यक वाचा.