Type Here to Get Search Results !

सरदार वल्लभभाई पटेल सविस्तर मराठी माहिती | Sardar Vallabhbhai Patel All Information In Marathi

 सरदार वल्लभभाई पटेल  सविस्तर मराठी माहिती | Sardar Vallabhbhai Patel  All Information In Marathi
प्रस्तावना

मित्रांनो, 31 ऑक्टोबर रोजी "भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल "( Sardar Vallabhbhai Patel) यांच्या जयंतीच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल विषयी सविस्तर माहिती मराठी मधून स्पष्टपणे संपूर्ण माहिती देण्यासाठी हा लेख हाती घेतला आहे.  आपण आज भारताचे पहिले उपपंतप्रधान तसेच भारताचे पहिले गृहमंत्री याविषयी माहिती उपलब्ध या लेखातून करून देण्यासाठी  दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. "लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल" यांच्या बाबत सविस्तर माहिती .आपण पुढील प्रमाणे अभ्यास करणार आहोत आहोत.


सरदार वल्लभभाई पटेल  सविस्तर मराठी माहिती
सरदार वल्लभभाई पटेल  सविस्तर मराठी माहिती 


सदार वल्लभभाई परटेल (toc)


सरदार वल्लभभाई पटेल जीवन परिचय

'सरदार वल्लभभाई पटेल' यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 मध्ये गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यात  करमसद या गांवात त्यांच्या मामाच्या घरी शेतकरी कुटुंबात लेवा पाटीदार समाजात झाला झाला. त्यांच्या आईचे नांव लाडबा हे होते. तर वडिलांचे नांव झवएरभआई होते. त्यांच्या आई-वडिलांना एकूण चार पुत्रे आणि दोन मुली होत्या . सरदार वल्लभभाई पटेल आई आणि वडील यांचे करमसद याच गांवचे रहिवासी होते. त्यांच्या च भावंडा चे नांवे सोमाभाई, नरसिंहभाई आणि विठ्ठलभाई हे होते. तसेच त्यांना दोन धाकट्या बहिणी सुद्धा होत्या. त्यांच्या धाकट्या बहिणीचे नावे अनुक्रमे कासाबाई आणि दहिबा होती. त्यांचे संपूर्ण बालपण हे त्यांच्या कुटुंबासोबत शेतीचे काम करण्यात गेले. लहानपणी त्यांनी आपल्या वडिलांना शेतीचे काम करण्यास मदत केली होती. म्हणून शेतकरी जीवन 'सरदार वल्लभभाई पटेल' यांनी अगदी जवळून पाहिले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्म दिनांक बाबत निश्चित अशी माहिती प्राप्त होत नाही. परंतु ते मॅट्रिकला असताना 31 ऑक्टोबर ही जन्मतारीख नमूद केली होती.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी शैक्षणिक माहिती

'सरदार वल्लभभाई पटेल' यांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या जन्मगावी म्हणजे करमसद येथे पूर्ण झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी विद्यार्थी दशेत च एक विद्यार्थी संघटना उभी करून विद्यार्थ्याला न्याय देण्यासाठी शिक्षका विरुद्ध त्यांनी बंड पुकारले. त्यांनी स्थापन केलेल्या विद्यार्थी संघटनेमार्फत शिक्षका विरुद्ध केलेल्या बंडात संप घडून आणला. आणि फक्त तीन दिवसात त्यांनी केलेल्या संपात ते यशस्वी झाले. तीन दिवसातच विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून होणारा त्रास बाबत विद्यार्थी संघटनेमार्फत संप यशस्वी करून न्याय मिळवून दिला. म्हणूनच खऱ्या अर्थाने राजकीय जीवनाची आणि भारतीय स्वातंत्र्याची स्वप्न त्यांच्या प्राथमिक शिक्षणा तच निर्मिती झाली असे म्हणणे काहीसे अवघे होणार नाहीत. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील  शिक्षणासाठी ते पेटलाड, बडोदा आणि नानिया येथे घेतले. सरदार वल्लभाई पटेल यांचा विवाह विद्यार्थीदशेच 1891 मध्ये झाला. त्यांच्या पत्नीचे नांव जेव्हरबाई हे होते. खऱ्या अर्थाने त्यावेळी त्यांचा विवाह असे म्हटले तरी जरीही विवाह झाला असला तरीही त्यांनी जीवनातील संपूर्ण शिक्षण हे पूर्ण करून दाखवले.त्यांनी त्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची परीक्षा 1897 नाडियाड गावातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या घरांची गरिबी परिस्थिती असल्यामुळे त्यावेळी त्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नाही परंतु पुढे त्यावेळेस अस्तित्वात असलेली वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. वकिली व्यवसाय करून त्यातून  पैसे मिळवून बॅरिस्टर होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची जबरदस्त इच्छा त्यांच्याजवळ होती.


सरदार वल्लभाई पटेल यांच्या वकिली बाबत सविस्तर माहिती

वकिलीची परीक्षा पास झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी न्यायालयात जाऊन फौजदारी खटले चालवले. हे संपूर्ण खटले त्यांनी गोध्रा येथे चालू होते. वकिली व्यवसाय करताना त्यांना पैसा आणि प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टीचा फायदा झाला. त्यांनी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आपल्या वकिली व्यवसायातून दहा हजार रुपये जमले आणि मिळालेल्या पैशाचा योग्य वापर केला. त्यांनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याकरिता जमवलेल्या पैशाचा उपयोग करून इंग्लंडमध्ये जाण्यासाठी पारपत्र ही तयार तयार करून काढून घेतले. आपल्या मोठ्या भावाच्या नांवा चे पहिले अक्षर वि. होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या नावाचे पहिले अक्षर सुद्धा वि. होते. सुरुवातीचे अध्य अक्षर सारखेअसल्यामुळे त्यांच्या वडील बंधू ने म्हणजे विठ्ठल बाई यांनी फायदा घेऊन बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जाण्याचे ठरवले. या कामासाठी सरदार वल्लभाई पटेल यांनी आपल्या थोरल्या बंधू आर्थिक मदत पैसे देऊन तसेच काही कपडे देऊन लंडनला जाण्यास संमती दिली. विठ्ठलबाई बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला 1905 मध्ये गेले. संपूर्ण भावाचा आणि कुटुंबाचा प्रपंच चालवण्यासाठी सरदार वल्लभाई पटेल यांनी विठ्ठल बाई यांना फार मोठी मदत केली. तसेच आपला संपूर्ण घर प्रपंचसुद्धा चालवला. परंतु अचानक पणे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. सरदार वल्लभ भाई पटेल च्या पत्नी 1909 मध्ये निधन पावल्या. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातून ते स्वतः सावरून १९१०साली बॅरिस्टर होण्यासाठी तेसुद्धा इंग्लंडला गेले. इंग्लंड येथे बॅरिस्टरची परीक्षा अतिशय कठीण परिस्थितीत अभ्यास करून इंग्रजी माध्यमातून बॅरिस्टर परीक्षा इंग्लंडमध्ये पहिल्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाले. त्यावेळी त्यांनी बॅरिस्टर परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना पन्नास पौंड चे पारितोषिक त्यांचा गौरव केला. ते इंग्लंडमध्ये प्रथम क्रमांकाने बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केल्यानंतर 1913 मध्ये ते भारतात परत आले. सरदार वल्लभाई पटेल हे भारतात आल्यानंतर त्यांनी आपली वकिली अहमदाबाद येथे सुरू केली. शिक्षणामुळे कोणते परिवर्तन होते हे त्यांनी सर्वांना दाखवून दिले. अशी त्यांची शैक्षणिक परिवर्तनाची दिशा आपल्या लेखातून स्पष्टपणे नमूद केली आहेत.

सरदार वल्लभ भाईपटेल यांचे वकिली व्यवसायात पदार्पण

अहमदाबाद येथे वकिली करत असताना सरदार वल्लभभाई पटेल यांची वकिली पेशातील दिनचर्या सुरू झाली. वकिली व्यवसायात नामांकित वकील म्हणून अहमदाबाद मध्ये त्यांचे नाव त्याकाळी अजरामर झाले. वकिली व्यवसाय करत असतांना प्रथम ते लोकमान्य टिळक यांच्या संपर्कात आले आणि तेथून पुढे त्यांच्या खऱ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली.

राजकीय जीवनाची सुरुवात

लोकमान्य टिळक यांच्या संपर्कात आल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रथम लोकमान्य टिळक यांच्या जहाल पक्षात त सामील झाले. जहाल पक्ष हा लोकमान्य टिळक यांनी आपल्या देशाला इंग्रजांकडून स्वातंत्र्यप्राप्ती करण्यासाठी स्थापन केलेला जहाल पक्ष होय. आणि अशा जहाल पक्षात त्यांनी जहाल पक्षात प्रवेश केला. सरदार वल्लभाई पटेल यांचे सुरुवातीचे प्रारंभिक जीवन हे विलासी व चैनीचे होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात चैनीच्या जीवनात क्लबला जाणे सुरू केले आणि उरलेल्या दिनचर्या क्लब मध्ये पत्ते खेळण्यांमध्ये ते जीवन घालवत होते. आपल्या वकिली व्यवसायाकडे दुर्लक्ष न करता चैनीचे जीवन घालवण्यात त्यांना मोजमजा वाटत होती. जोपर्यंत महात्मा गांधी अहमदाबाद मध्ये आले नव्हते तोपर्यंत त्यांची दिनचर्या वकिली करणे आणि क्लब मध्ये पत्ते खेळणे एवढेच कार्य करत होते. परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनात पदार्पण झाले ते म्हणजे महात्मा गांधी अहमदाबादला पोहोचले म्हणजेच अहमदाबादला आले. सरदार वल्लभाई पटेल महात्मा गांधी यांच्या शी संपर्कात येऊन महात्मा गांधीचा उद्देश त्यांनी ऐकला आणि आपले संपूर्ण जीवन गांधीजींच्या सहवासात 1917 मध्ये बदलून गेले. महात्मा गांधीच्या संपर्कात आल्यामुळे महात्मा गांधीजींनी त्यांना संपूर्ण देशाचा इतिहास व इतिहासाचा आराखडा सरदार वल्लभाई पटेल यांना समजावून सांगितला. गुजरात राज्यामध्ये गुजरात सभा स्थापन करण्यात आली . महात्मा गांधी  बरोबर त्यांनी गुजरात सभेमध्ये सहभाग घेतला. गुजरात सभेचे अध्यक्ष स्वतः महात्मा गांधी हे होते तर या गुजरात सभेची मुख्य जबाबदारी महात्मा गांधी यांनी त्यांच्यावर सोपवली. गुजरात सभेचे सरदार वल्लभाई पटेल हे चिटणीस झाले. म्हणजेच सेक्रेटरी झाले. सरचिटणीस झाल्यानंतर त्यांनी सण १९१७ ते १८ या साला मध्ये खेडा  सत्याग्रहात मोठ्या प्रमाणात सत्याग्रहात भाग घेतला. क्रीडा सत्याग्रहात भाग घेऊन तो सत्याग्रह आणि सत्याग्रहाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेऊन लढा यशस्वी करून दाखवला यातच त्यांचे मोलाचे कार्य दिसून येते. यानंतर ते प्रत्येक सत्याग्रहात सहभागी होऊ लागले. हळूहळू त्यांना देश स्वातंत्र्य व राजकारण याबाबत आपले स्वतःचे मत त्यांनी पूर्णपणे बदलून टाकून प्रत्येक सत्याग्रहात कठोर आणि कणखर भूमिका घेतली. त्यामुळे गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव अलौकिक झाले. खेडा सत्याग्रह नंतर गुजरात मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी भाग घेतला. अहमदाबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत ते निवडून आले. अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून 1924 ते 28 च्या दरम्यान संपूर्ण नगरपालिका मध्ये विविध विकासात्मक कामे हाती घेऊन त्यांनी त्यांचे कार्य अहोरात्र सुरू ठेवले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी महापालिकेचे अध्यक्ष असताना अहमदाबाद हे शहर स्वच्छ व सुंदर करून दाखवले. त्यांच्या सुधारणा कार्यामध्ये ज्या कामात त्यांनी विशेष  लक्ष दिले ते काम म्हणजे जल विकास व पाणीपुरवठा योजना आणि गुजरात मध्ये चालणारी वेठबिगारी ची पद्धत बऱ्याच प्रमाणात संपवण्याचा प्रयत्न केला. अहमदाबाद पालिकेचे अध्यक्ष असताना गुजरातमध्ये त्यांनी संपूर्ण जलप्रलय झाला होता. या जलप्रणायात मोठ मोठ्या नद्यांना महापूर येऊन सर्व गुजरात जन्म झाले होते त्यावेळी पुरग्रस्तांना व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी फार मोठी कधी न विसरणारी म्हणजेच अविस्मरणीय कार्य केले. महत्त्वपूर्ण विकासाची कामे नगराध्यक्ष असताना त्यांनी केली.

स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान

महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यापासून सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली सतत कार्यरत राहिले. महात्मा गांधीजी यांनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत त्यांनी सहभाग घेतला व गांधीजींच्या असहकार कार्याकरिता सरदार वल्लभाई पटेल हे प्रथम आघाडीवरचे कार्यकर्ते म्हणून असहकार धोरणात महत्त्वपूर्ण काम केले. तसेच असहकार चळवळ यशस्वी करण्यासाठी गांधीजी यांना सहकार्य करून स्वातंत्र्यलढ्यात यशस्वी पदार्पणच झाले असे म्हणावे लागत आहे. गांधीजींची असहकार चळवळीला इंग्रज पार्लमेंट कडून विरोध करण्यात आला. आणि इंग्लंड किंवा ब्रिटिश पार्लमेंट मध्ये काळा कायदा म्हणजेच आपण त्याला रौलट अॅट act म्हणतो त्या रौलेटच्या संदर्भाने त्या कायद्याच्या वेळी त्यांनी  आक्षिप्त राष्ट्रीय साहित्य विकले व ठिकठिकाणी काळ्या कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने सुद्धा केली. कठोर आणि कणखर वृत्तीमुळे तसेच गांधीच्या सहवासामुळे संपूर्णपणे त्यांच्या राहणीमानाचा त्यांनी त्याग केला. व आपला वकिलीचा व्यवसाय सोडून दिला म्हणजेच वकिली व्यवसायाचा त्याग केला आणि तत्काळ वकील सोडली. याच सुमारास त्यांनी अत्यंत महत्त्वाचे एक कार्य केले ते कार्य आपणास माहीत नसावे म्हणून स्पष्ट करत आहे गुजरात आणि अहमदाबाद येथे घरोघरी फिरवून दहा लाखाचा निधी गोळा करून 1920 मध्ये त्यांनी गुजरात राज्यासाठी शिक्षणाचे दालने खुली करून गुजराती विद्यापीठाची स्थापना ही सुद्धा त्यांनी केली. सरदार वल्लभाई पटेल यांनी हळूहळू सर्व स्वातंत्र्यासाठी हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्यास सुरुवात करून पूर्ण करूनही दाखवले. मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल एवढे कणखर आणि कठोर तिचे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महान नेते यांनी 1921 मध्ये गुजरात प्रांतिक काँग्रेस अध्यक्ष झाले आणि लवकरच त्यांनी अहमदाबाद येथे काँग्रेसचे अधिवेशन बोलवले आणि त्या गुजरात काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ध्येय आणि उद्दिष्टे अधिवेशनातून आम जनतेसमोर मांडली. सरदार वल्लभभाई पटेल यानंतर संपूर्ण भारतात नांव अलौकिक की करून प्रत्येक ठिकाणी सत्याग्रह करून इंग्रज सत्तेच्या विरोधात सुरू केले.

त्यांनी नागपूर मध्ये सुद्धा एक सत्याग्रह केला. तो सत्याग्रह म्हणजे झेंडा सत्याग्रह होय. भारतीय झेंड्याखाली आपण एकत्र येणे आणि एक छत्री अमल सुरू करून इंग्रज सरकारला इंग्रज सरकारला विरोध दर्शविण्यात आला. नागपूर मधील त्यांचे झेंडा आंदोलन हे 1923 मध्ये संपूर्ण भारताला यशस्वी करून दाखवले त्यानंतर याच वर्षी त्यांनी आणखी एक सत्याग्रह यशस्वी करून दिला तो सत्याग्रह म्हणजे बोरसद सत्याग्रह होय.

त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा एक सत्याग्रह तो आपला लक्षात असेलच तो सत्याग्रह म्हणजे बारडोलीचा सत्याग्रह होय. भारताच्या इतिहासात बारडोलीचा सत्याग्रह फार मोठ्या प्रमाणात झालेला हा सत्याग्रह होईल.

बारडोलीचा सत्याग्रह

बारडोलीचा सत्याग्रह हा गुजरात राज्यातील 1928 मध्ये घडलेला सविनय कायदेभंग सत्याग्रहाचा एक भाग आहे. बारडोली हे गाव गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यात असणारे गाव आहेत. या गावामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा सत्याग्रहात्मक केलेल्या आंदोलनाचा अविभाज्य भाग आहे. या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले.

'सरदार वल्लभाई पटेल 'यांनी बारडोली सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध असणारा जो 1928 मध्ये गुजरात राज्यात घडला. बारडोली सत्याग्रह हा फेब्रुवारी 1928 ते ऑक्टोंबर 28 पर्यंत हा लढा चालू या लढ्यात सरदार वल्लभाई पटेल यांचा विजय झाला. व कर वसूल करणाऱ्यांचा पराजय झाला गुजरात राज्यामध्ये बारडोली मध्ये इंग्रज सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्याकडून फार मोठ्या प्रमाणात कर जमा करण्यास सुरुवात केली होती. असहकार चळवळीच्या नेतृत्वाखालीच गांधीजींना विश्वासात घेऊन कोणत्याही प्रकारची हिंसा न करता हा बारडोली सत्याग्रह यशस्वी करून दाखवला. शेतकऱ्याकडून बळजबरीने म्हणजेच जबरदस्तीने जो कर वसूल करण्यात येत होता तो अतिशय मोठ्या प्रमाणात होता. या लढ्याचे नेतृत्व यशस्वीपणे पूर्ण करून शेतकऱ्यांना करमुक्त करण्यास सरदार वल्लभभाई पटेल यशस्वी झाले. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना. शेतकऱ्याचा नेता किंवा सरदार म्हणून ही पदवी देण्यात आली तेव्हापासून वल्लभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिल्यामुळे त्यांना सरदार वल्लभभाई पटेल म्हणून देशभर ओळखले गेले.

भाषण बंदी आंदोलनात विरोध

इंग्रज सरकारने भारतामध्ये 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहाच्या अंतर्गत गांधीजींनी जी चळवळ सुरू केली होती. त्या चवळीच्या संदर्भात" भाषण बंदी "हा कायदा इंग्रजांनी भारतात आणला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सविनय कायदेभंगाच्या अंतर्गत भाषण बंदी आंदोलनास मूठ माती दिली. गावोगाव फिरून त्यांनी भाषण देण्यास सुरुवात केली. त्यांनी इंग्रज सरकारचा हुकूम मोडला आणि भाषण देण्यास सुरुवात केली. रासगांव येथे सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्रजा विरुद्ध भाषण दिले. त्यामुळे इंग्रजांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पकडून शिक्षा म्हणून तुरुंगवास भोगाव लागला. जवळजवळ सरदार वल्लभभाई पटेल तीन महिने नऊ दिवस आणखी शिक्षा दिली. सरदार वल्लभाई पटेल यांचे कार्य व काँग्रेस मधील कार्य यांचा विचार करता सरदार वल्लभाई पटेल यांना कराची काँग्रेसचे अध्यक्ष स्थान देण्यात आले. सतत गांधीजी बरोबर असहकार चळवळीत कार्य करत असताना गांधीजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी सतत संघर्षमय जीवन जगले. गांधीजी बरोबर स्वातंत्र्यासाठी लढा देत असताना गांधीजी बरोबरच त्यांनाही 1932 मध्ये अटक करण्यात आली. व येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले. 1932 ते 1934 पर्यंत ते कारागृहात कैदी म्हणून ठेवण्यात आले. इंग्रजांनी त्यांना 1934 मध्ये सोडण्यात आले. ज्यावेळेस इंग्रजांनी सरदार वल्लभाई पटेल यांना तुरुंगातून सोडण्यात आले त्यावेळी हिंदुस्तान वर एक फार मोठे संकट आले होते. बिहारमध्ये भूकंप घडला. भूकंप घडल्यानंतर काँग्रेस विधिमंडळ आणि प्रवेशात्मक धोरणात बदल करण्यात आले व नवीन एक बोर्ड स्थापन करण्यात आले. ते नवीन बोर्ड म्हणजे पार्लमेंटरी बोर्ड ची स्थापना होय. या पार्लमेंटरी बोर्डाच्या उपस्थितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.

स्वातंत्र्यलढ्याचा उत्तरार्ध

1936 साली प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका आयोजित करण्यात आल्या व निवडणुका घेण्यात आल्या या निवडणुकीमध्ये प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणूक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केल्या गेली. सरदार वल्लभ भाई पटेल यांची कामगिरी अत्यंत मोलाची संपूर्ण भारतभर अजरामर होत होती व त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय आणि हिरीरीने भाग घेतला. हरिपूर काँग्रेसचे अधिवेशन बोलवण्यात आले त्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांना स्वागताध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून सुभाष चंद्र बोस हे होते आणि स्वागताध्यक्ष म्हणून सरदार वल्लभाई पटेल हे होते. त्याचवेळी राजकोट येथे एक महत्त्वाची घटना घडली ती घटना म्हणजे राजकोटच्या महाराजांबरोबर संस्थानांनी जनतेमार्फत तोडजोड करण्याचे काम सुरू झाले .राजकोटचे महाराज आणि प्रजा यामध्ये तडजोड करणे. सोपी गोष्ट नव्हती. प्रजेसोबत महाराजांनी तडजोड करण्यास सामान्य केल्यामुळे सरदार वल्लभाई पटेल यांनी पुन्हा कायदेभंग सुरू केला. या कायदेभंग सुरू केल्या प्रकरणी दरम्यानच्या काळात गांधीजींनी 3 मार्च ते सात मार्च 1939 च्या दरम्यान उपोषणास सुरुवात केली व उपवास सुरू करावा लागला.सरदार वल्लभभाई पटेल यांनी आणखी एक सत्याग्रह सुरू केला तो नवीनच सत्याग्रह होय. तो सत्याग्रह म्हणजे वैयक्तिक सत्याग्रह म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत. हा सत्याग्रह 1940 च्या नोव्हेंबर महिन्यात वैयक्तिक सत्याग्रह म्हणून सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. या स्थानबद्धतीतून मुक्तता केल्यानंतर नवीन एक चळवळ त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची कलाटणी देणारी चळवळ ठरली. ती चळवळ म्हणजे महात्मा गांधीजी यांनी इंग्रज सरकारला 1942 मध्ये ठणकावून सांगितले की "चले जाव"8 ऑगस्ट 1942 च्या भारत छोडो या आंदोलनामुळे संपूर्ण देशभर ठिकठिकाणी 8 ऑगस्ट 1942 च्या मध्यरात्री चळवळीला सुरुवात होऊन देश पेटून उठला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण गुजरात मध्ये गांधीजीने दिलेली चळवळीची हाक चले जा म्हणून गुजरात मधून गुजरात जनता यांना खळबळून जागे करून चलेजावच्या आंदोलनात गुजरात संपूर्ण पेटून उठला त्यावेळेस काँग्रेस नेत्यांची धरपकड सुरुवात झाली . त्या काँग्रेसच्या धरपकड चळवळीत इंग्रजांनी काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना अहमदनगरच्या किल्ल्यात काँग्रेसच्या नेत्या बरोबर अटकेत ठेवले. भारतीय स्वातंत्र्याच्या शेवटच्या पर्वत घडलेली ही महान कथा असून काही नेत्यांना पुणे येथे आगाखान पॅलेस मध्ये तर काही नेत्यांना अहमदनगर किल्ल्यात ठेवण्यात आली. सरदार वल्लभाई पटेल यांची अहमदनगर किल्ल्यातून 19 15 जून 1945 रोजी सुटका झाली. त्यांची सुटकेतून मुक्तता झाल्याबरोबर त्यांनी अनेक परिषदा आणि अनेक प्रकारचे मिशन हाताखाली घेतले व अनेक बंड केली. त्यांनी सिमला परिषद आयोजित केली कॅबिनेट मिशनमध्ये भाग घेतला तसेच मुंबईमध्ये नाविक बंडाला 1946 मध्ये आंदोलनास आळा घालण्यात आला.अखेरच्या पर्वामध्ये दोन सप्टेंबर 1946 रोजी जे हंगामी सरकार किंवा मंत्रिमंडळ अस्तित्वात आले होते त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे गृहमंत्री म्हणून एक खाते समाविष्ट करण्यात आले होते. ते घटना परिषदेचे सभासद पण होते. सुरुवातीच्या काळात सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांनी कॅमिनिस्टाचे सर्व बंडे हाणून पाडली. मिटून काढली . सरदार वल्लभाई पटेल यांचे महत्त्वाचे काम म्हणजे राष्ट्रीय एकाचे काम म्हणजे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. भारतामध्ये साडेपाचशे पेक्षा जास्त संस्थानिक कार्यरत होते ते सर्व संस्थानिक भारतात सामील करून घेतली. परंतु असे काही तीन संस्थानिक होते की ते भारतात विलीन होण्यास तयार नव्हते. ते संस्थानिक म्हणजे हैदराबाद संस्थान, जुनागड संस्थान आणि काश्मीर संस्थान तीन संस्थानिक भारतात विलीन होण्यास तयार नव्हते त्यांच्याविरुद्ध सरदार वल्लभाई पटेल यांनी पोलीस कारवाई करून भारतात सामील करून घेतले आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली. संस्थानाच्या विलीनीकरणानंतर त्यांना महत्त्वाचे सहाय्य जर कोणी केले असेल तर ते म्हणजे व्ही. पी. मेनन. त्यांनी गुजरात राज्यातील सोमनाथ मंदिराच्या पुनर्जीवनासाठी आणि तेथील मंदिराच्या साठी एक विश्वस्त निधी उभा केला आणि या मंदिरांची दारे सर्व भारतीयांसाठी सर्व धर्मांसाठी आणि पुरुषांसाठी खुले केले. सोरटी सोमनाथ मंदिरात सर्वांना प्रवेशास संधी हा त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा क्षण ठरला आहे. त्यांची ही इच्छा 1951 मध्ये पूर्ण झाली.

स्वातंत्र्याचा कालखंड

देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले त्यानंतर भारताचे सरकार स्थापन करण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळात काम करत असताना भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना काम करण्याची संधी मिळाली. महात्मा गांधी जी चा 30 जानेवारी 1948 रोजी खून झाला त्यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल हे स्वतः गृहमंत्री होते त्यामुळे त्यांना अत्यंत या गोष्टीचे दुःख झाले. कायदे मंडळात आपण गृहमंत्री असून आपल्या कालखंडामध्ये गृहमंत्र्यांचा कारभार सांभाळत असताना गांधीजीचा खून होतो. त्यांच्या मनाला खोलवर जाऊन रुजली. त्यांना या गोष्टीचे एवढे दुःख झाले की काही दिवसातच त्यांना त्यांची प्रकृती ढसाळत गेली आणि एवढी घालवत गेली की त्या गोष्टीला पारावर उरला नाही. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि आणखीन प्रकृती खालावत गेली. त्यावेळी 31 ऑक्टोबर 1948 रोजी मुंबईमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा सत्कार हा रत्नजडित सोन्याच्या अशोक स्तंभ आणि चांदीची मोठी प्रतिमा त्यांना अर्पण करण्यात आली.   

सरदार वल्लभभाई पटेल यांचे शेवटचे जीवन

भारतामध्ये ठिकठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदवी अर्पण केली. उस्मानिया विद्यापीठ प्रराग विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ यांनी त्यांना सन्मानपूर्वक डॉक्टरेट पदवी दिली त्याचबरोबर अमृत महोत्सव निमित्त 1950 स*** अहमदाबाद शहरा मार्फत त्यांना पंधरा लाख रुपयाची थैली मोठ्या सन्मानाने अर्पण केली. पुढे हळूहळू सरदार वल्लभाई पटेल प्रकृतीने अतिशय क्षीण होऊ लागले. ते अतिशय क्षीण लागले. त्यामुळे वातावरणात बदल व्हावा म्हणून ते मुंबईला 13 डिसेंबर 1950 ला आले. शेवटी त्यांना शेवटचा हृदयविकाराचा झटका येऊन पंधरा डिसेंबर 1950 रोजी त्यांचा अंत झाला. त्यांच्या मुलाचे नाव डाह्याभाई आणि मुलीचे नाव मनिबेन होते.


सारांश

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कणखर वृत्तीचे कठोर पुरुष म्हणून लोहपुरुष म्हणून आपण सर्व भारतीय ओळखतो. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिस्तबद्ध रीतीने नियोजन करून स्वातंत्र्यासाठी लढा देणारे लोहपुरुष म्हणजे भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून प्रसिद्ध असणारे यांच्या जयंतीनिमित्त आज हा लेख लिहून या लेखात जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास सलाम करून या लेखात पूर्णविराम देतो. धन्यवाद !वंदे मातरम्!

AQF

1) भारतात लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते?

सरदार वल्लभभाई पटेल.

2). सरदार ही पदवी त्यांना कोणी दिली?

सरदार ही पदवी त्यांना बारडोलीच्या सत्याग्रहा नंतर यशस्वी नेतृत्व करून शेतकऱ्यांना विजय मिळवून दिला. म्हणून शेतकऱ्यांनी सरदार ही पदवी दिली.

3) सरदार वल्लभ भाई पटेल यांनी कोणते संस्थान खालसा केले?

हैदराबाद जुनागड आणि काश्मीर.

4) सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म केव्हा झाला होता?

31 डिसेंबर 1875.

5) भारताचे पहिले उप पंतप्रधान कोण होते?

सरदार वल्लभभाई पटेल.

अधिक माहितीसाठी आमचे खालील इतर लेख अवश्य वाचा





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation