नवीन राष्ट्रीय शैक्षणिक मराठी माहिती | New National Education Policy Marathi Mahati

New National Education Policy Marathi Mahati
प्रस्तावना
मित्रांनो, भारत सरकारने "नवीन शैक्षणिक धोरण आराखडा 2020" मंजूर केला असून त्याबाबत आपणास माहिती असावी म्हणून आज आपण " नवीन शैक्षणिक धोरण" या बाबत सविस्तर माहिती या लेखात मराठी भाषेतून स्पष्टपणे नमूद करणार आहेत. "नवीन शैक्षणिक धोरण 2020"( New National Education Policy 2020) या विषयी महत्त्वाच्या मुद्द्यावर खालील प्रमाणे लेख लिहिण्यासाठी घेतला असून पुढील प्रमाणे या 'नवीन शैक्षणिक धोरण'या बद्दल माहिती स्पष्ट करू या.
भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात 1986 च्या शैक्षणिक धोरणानंतर जवळपास भारत सरकारने गेल्या 34 वर्षानंतर आता 'नवीन शैक्षणिक धोरण आराखडा 'संसदेत बहुमताने मंजूर करून संपूर्ण राष्ट्रांमध्ये लागू केला आहे. " New National Education Policy Marathi "
New National Education Policy Marathi Mahati(toc)
भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात 1986 च्या शैक्षणिक धोरणानंतर जवळपास भारत सरकारने गेल्या 34 वर्षानंतर आता नवीन शैक्षणिक धोरण आराखडा संसदेत बहुमताने मंजूर करून संपूर्ण राष्ट्रांमध्ये लागू केला आहे. सर्व घटक राज्यात या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर म्हणजेच नॅशनल national education policy भरपूर प्रमाणात टिकात्मक तसेच मूल्यमापनात्मक चर्चा होत आहे मग नेमके या धोरणात आहे तरी काय ? हे जाणून घेण्याची उत्सुकता पालक शिक्षक विद्यार्थी आणि अनेक प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आता काय आमुलाग्र बदल होणार आहेत.
![]() |
New National Education Policy Marathi Mahati |
प्रस्तावना
मित्रांनो, भारत सरकारने "नवीन शैक्षणिक धोरण आराखडा 2020" मंजूर केला असून त्याबाबत आपणास माहिती असावी म्हणून आज आपण " नवीन शैक्षणिक धोरण" या बाबत सविस्तर माहिती या लेखात मराठी भाषेतून स्पष्टपणे नमूद करणार आहेत. "नवीन शैक्षणिक धोरण 2020"( New National Education Policy 2020) या विषयी महत्त्वाच्या मुद्द्यावर खालील प्रमाणे लेख लिहिण्यासाठी घेतला असून पुढील प्रमाणे या 'नवीन शैक्षणिक धोरण'या बद्दल माहिती स्पष्ट करू या.
भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात 1986 च्या शैक्षणिक धोरणानंतर जवळपास भारत सरकारने गेल्या 34 वर्षानंतर आता नवीन शैक्षणिक धोरण आराखडा संसदेत बहुमताने मंजूर करून संपूर्ण राष्ट्रांमध्ये लागू केला आहे. सर्व घटक राज्यात या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर म्हणजेच नॅशनल national education policy भरपूर प्रमाणात टिकात्मक तसेच मूल्यमापनात्मक चर्चा होत आहे मग नेमके या धोरणात आहे तरी काय ? हे जाणून घेण्याची उत्सुकता पालक शिक्षक विद्यार्थी आणि अनेक प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आता काय आमुलाग्र बदल होणार आहेत.
राष्ट्रीय धोरणातील महत्त्वाचे मुद्दे-
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे काय?
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणार.
- शैक्षणिक धोरणाची मूल्यमापन पद्धती.
- संपूर्ण राष्ट्रीय धोरणाचा आराखडा.
- शैक्षणिक धोरणाचे स्तर.
नवीन शैक्षणिक धोरणाचा आकृतीबंध.
भारतातील सध्या अस्तित्वात असलेली विद्यमान शिक्षण पद्धती ही 1986 च्या धोरणानुसार दहा अधिक दोन स्तरावर लागू असून या पद्धतीमध्ये शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था स्थापन करून प्रयत्न करण्यात आले .पण या शिक्षण पद्धतीतून व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची पद्धत असमर्थ ठरली आहे. त्यामुळे भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आराखडा तयार करून 34 वर्षानंतर 21 व्या शतकात पदार्पण केले व नवीन शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यासाठी भारत सरकारने 29 जुलै 2020 रोजी अमुलाग्र बदल घडण्यासाठी संसदेत हे विधेयक मंजूर करून घेऊन भारतात लागू करण्यासाठी निर्गमित केले. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे सर्व घटक राज्यांना लागू करून त्या आराखड्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक घटक राज्य त्यांच्या स्तरावर ही प्रयोगात्मक पद्धत प्रयोग म्हणून 2023 - 24 मध्ये राबवणार आहे. महाराष्ट्रात सध्या विद्यापीठ स्तरावर सुरू करण्यात चे प्रयत्न सुरू आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा म्हणजेच आकृतीबंध समजावून घेणे आवश्यक आहे. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणाची तत्वे ,स्वरचना बदल, अध्यापन पद्धती ,शिक्षक भरती ,व्यावसायिक विकास व मानके व शिक्षकांचे प्रशिक्षण याबाबतीत आमुलाग्र बदल झालेला असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी समजावून घेणे आवश्यक आहे.
नवीन शैक्षणिक धोरण कार्यवाही बाबत माहिती-
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षक केंद्रभूत मानून त्याच्याभोवती संपूर्ण प्रक्रिया अंगणवाडी पासून तर विद्यापीठे शिक्षणापर्यंत धोरण तयार करण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणा चे अध्यक्ष डॉक्टर के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या धोरणाचा 484 पानाचा आराखडा भारत सरकारला 31 मे 2019 रोजी सादर केला. त्यानंतर सरकारने साधक बाधक विचार करून व लोकांच्या सुधारणात्मक मागण्या मान्य करून समाजातील सर्व घटकांना सहभागी करून त्यांच्याकडून सूचनाही मागवण्यात आल्या व त्या सूचनाचाही विचार करण्यात आला व सर्व गोष्टीचा नकशिकांत विचार झाल्यानंतर शासनाने 484 पानाचा आराखडा सर्व गोष्टीचा विचार करून फक्त 66 पाणी धोरणाला सुटसुटीत मसुदा तयार केला आणि त्या आराखड्यास म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या आराखड्याला 29 जुलै 2020 रोजी मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन राबवण्याचे निश्चित केले .19 86 ते 2020 पर्यंत कोणत्याच सुधारणा न झाल्यामुळे हा आराखडा जगातील भारत एक महान शक्ती बनण्यासाठी 34 वर्षानंतर मंजूर करून घेतला.
नवीन शैक्षणिक धोरण आराखड्याची चार भाग करण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण
उच्च शिक्षण
साध्य करण्याचे उद्दिष्टे
प्रत्यक्ष अंमलबजावणी संदर्भात महत्वपूर्ण बाबी
वरील चार विभागामुळे अमुलाग्र बदल झाल्याचे प्रतिबिंब या नवीन शैक्षणिक धोरणात दिसून येते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यातील प्रमुख बाबी-
अध्यापन शास्त्रात उत्क्रांती.
भारतीय परंपरा लक्षात घेऊन तयार केले.
शिक्षक केंद्रस्थानी ठेवण्यात आला.
समाज पातळीवरील आदरणीय सदस्यांची मदत.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण.
वंचित व अल्प प्रतिनिधी गटावर विशेष लक्ष केंद्रित.
सर्वांना सहज शिक्षण.
समता.
गुणवत्ता.
परवडणारे शिक्षण.
शिक्षणाचे उत्तरदायित्व.
नवीन शैक्षणिक धोरणाचे स्तर-
नवीन शैक्षणिक पुढील प्रमाणे निर्मित करण्यात आले व त्या स्तराची रचनाही करण्यात आली
शालेय शिक्षणाच्या नवीन रचनेचे स्तर ५+३+३+४
तयार करण्यात आले असून शैक्षणिक धोरण अवलंबून आहे. प्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता विचारात घेऊन अध्ययन व अध्यापन दोन्ही पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल करून घोकंपट्टी पद्धत बंद करण्यात आली असून आनंदायी शिक्षण पद्धतीने अध्ययन आणि अध्यापन झाले पाहिजे हे महत्त्वाचे आहे.
यानुसार शालेय शिक्षण, प्रशिक्षण ,मूल्यमापन, पाठ्यपुस्तके आणि अध्ययन अध्यापन या तंत्रानमध्ये योग्य तो बदल करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार ह्या सर्व पद्धतीचा अवलंब करण्याचे निश्चित करण्यात आले. मानवाला आपल्या पूर्ण क्षमता वापर करण्यासाठी समाज व न्याय समाज विकसित करण्यासाठी व शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी व्यक्ती, समाज व देश यांच्या हितासाठी उच्च दर्जाची सार्वभौमत्व शिक्षण पद्धती भविष्यात उपयोगी पडेल असे धोरणात सांगितले आहे. भारत हा युवकांचा देश असून त्यांची पुरेपूर क्षमता विकसित करणारे व व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचे धोरण स्पष्ट केले आहे भारत 2030 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट महासत्ता बनवणारे हे शैक्षणिक धोरण आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये "जागतिक शिक्षण विकास कृती "कार्यक्रम सुद्धा समाविष्ट केला आहे
तसेच निरंतर शिक्षणालाही चालना
देण्यात आली.
कृती कार्यक्रम आराखडा
शैक्षणिक धोरणामध्ये सर्व विषयांचा समावेश करून विज्ञान व तंत्रज्ञानाकडे झेप घेणारा कृती कार्यक्रम आराखडा असून यामध्ये भारतीय कलेपासून तर आतापर्यंत ज्या ज्या पद्धती विकसित झाल्या व त्यानुसार विषय निश्चित झाले. ते सर्व विषय समाविष्ट करण्यात आले. आहेत .या शैक्षणिक धोरणाचे अनेक पैलू आहे त्यापैकी काही पैलू म्हणजे एकात्मिक, जिज्ञासू, संशोधन केंद्र, लवचिक , आनंददायी अध्यापन शास्त्र, हस्तकला, क्रीडा, स्वास्थ्य भाषा, साहित्य, संस्कृती आणि मूल्य यांचाही समावेश केला आहे.
सध्याच्या परिस्थितीतून अध्ययनातून होणारी होणारी निष्पत्ती आणि काय करणे आवश्यक आहे? यातील दरी कमी करून विद्यार्थ्यांच्या बाल संगोपणापासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण व्यवस्थेत सर्वोच्च दर्जा देऊन विद्यार्थ्यांना समानतेने एकात्मने एकात्मतेने शिकून मोठ्या सुधारणा भरून काढण्याचे अनिवार्य धोरण ठरविण्यात आले आहे .म्हणजेच विद्यार्थी जगातील अति उत्कृष्ट व्यवसाय विमुक बनेल व महासत्ता बनवेल या दृष्टीने तयार करणारी ही पद्धत नवीन शैक्षणिक धोरणात अनिवार्यपणे समाविष्ट केली आहे आणि 2040 पर्यंत विद्यार्थ्यांना सर्वोच्च दर्जाचे शिक्षण देऊन जगात महासत्ता बनवण्याची कार्य 2020 पासून सुरू झाली असून वर स्पष्ट केलेल्या चार स्तराप्रमाणे धोरणाच्या उद्दिष्टाला सुसंगत नवीन प्रणालीची जोड देऊन विविध रचनेचे पैलू तयार करून विशिष्ट शिक्षण पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रत्येक व्यक्तीला सर्जनशील क्षमतेवर भर देण्यासाठी व त्याच्या अंगातील मूलभूत क्षमता विकसित करण्यासाठी ही पद्धत प्राचीन सनातन भारतीय ज्ञानापासून तर आजच्या आधुनिक पद्धती पर्यंत भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या चरक पासून तर खगोलशास्त्र अभियांत्रिकीशास्त्र म्हणजेच सर्व शास्त्र विकसित करणारी जगातील मोलाची भर या नवीन शैक्षणिक धोरणाने घातली असून भारतीय संस्कृती व तंत्रज्ञान यांचा जगावर खूप मोठा प्रभाव पडून पुढील पिढीला जागतिक महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी व विद्यार्थ्यांना संशोधनात्मक वृत्ती निर्माण करणारी ही नवीन शैक्षणिक पद्धतीची किमया आहेत .आणि म्हणूनच शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार केला.या आराखड्याच्या भोवती शिक्षक केंद्र मागून भावी पिढीला आकार देणारा शिक्षक प्रभावी करण्यासाठी त्याचे प्रशिक्षण पूर्ण करून शिक्षकांचा आदर करून शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता घडवण्यासाठी शिक्षक किती महत्त्वाचा आहेत. हे या पद्धतीत निष्पन्न होते. विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत सर्वांना मोफत सक्तीचे शिक्षण बाल हक्क कायद्याचा समावेशही सुद्धा करून नवीन शैक्षणिक धोरण तयार केले आहे.
आधीचे धोरण
या धोरणाच्या आराखड्या अगोदर जे शैक्षणिक धोरण होते. ते 1986 च्या धोरणानुसार शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी व मुलांना निशुल्क अनिवार्य शिक्षण अधिनियम 90 आधारित शिक्षण साध्य करण्याची तत्वे कायदेशीर रित्या तयार करण्यात आली होती.
नवीन शैक्षणिक धोरणाची तत्वे.
आर्थिक विचार व कृती त साधणारा सक्षम कार्यक्रम.
सहानुभूती. धैर्य .करुणा व चिकाटी नुसार योग्य ते तत्वे.
विज्ञाननिष्ठा निर्माण करणे हेही तत्त्व आहे.
रचनात्मक कल्पनाशक्ती वाढ.
नैतिक मूल्य विकसित करणे.
चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे.
परीकल्पित न्याय मिळवून देणे.
सर्वसमावेशक आणि बहुलक समाजाच्या निर्मितीचा सहभाग घेणे.
कार्यक्षम आणि चांगल्या प्रकारे योगदान देणारा नागरिक तयार करणे.
विद्यार्थ्याचे सुप्त गुण ओळखणे.
सर्व माध्यमाच्या शाळेमधून धोरण लागू करणे.
शिक्षकाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे.
विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून शिक्षण देणे.
मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान गोष्टीवर भर देणे.
संख्याज्ञान व साक्षरता या गोष्टी इयत्ता तिसरी पर्यंत पूर्ण करणे
लवचिक शिक्षण पद्धती
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण देणे..
आयुष्यात उपयोगी पडेल अशाच प्रकारचे शिक्षण देणे.
शिक्षणातील उच्च व नीच भेद कमी करणे बहुशाकीय आणि समग्र शिक्षणाचा विकास करणे.
घोकंपट्टी बंद करणे.
परीक्षेसाठी शिकण्याऐवजी संकल्पना समजून देण्यावर भर देणे.
तार्किक व नाविन्यपूर्ण शिक्षण देणे.
घटनात्मक मूल्याचे शिक्षण देणे..
बहुभाषिक पद्धतीचा वापर करणे.
विविध जीवन मूल्य विकसित करणे.
वर्षाच्या शेवटी परीक्षेला केंद्रबिंदू ठेवून होणाऱ्या मूल्यमापनाद्वारे शिक्षणासाठी सातत्यपूर्ण संकल्पनेवर भर देणे.
तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करणे.
भाषेचे अडथळे दूर करणे.
नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे अभ्यासक्रम तयार करणे.
नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया राबवणे.
पारदर्शक पद्धतीचे शिक्षण देणे.
व्यवसायिक शिक्षण देणे.
उत्कृष्ट दर्जाचे संशोधन करणे.
संशोधनाचा सतत आढावा घेणे
शिक्षण ही एक सार्वजनिक सेवा म्हणून बालकाच्या मूलभूत हक्काकडे लक्ष देणे.
प्राचीन व आधुनिक शिक्षण पद्धतीचा संयोग स्थापने.
शैक्षणिक यासाठी खाजगी देणगीदार व सामुदायिक संस्थाच्या भागीदार.
नवीन शैक्षणिक धोरणात दूरदृष्टी धोरण अवलंबणे.
मूल्यासाठी शिक्षण व्यवस्थेत विभाग निर्माण केले आहे.
जुनी दहा अधिक दोन ही पद्धती बंद करून नवीन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
नवीन पद्धती ५+३+३+४ या स्तर पद्धतीचा वापर करणे.
स्तर पद्धतीचे वर्गीकरण-
पायाभूत स्तर-अंगणवाडी ते इयत्ता दुसरी पर्यंत.
पहिला पाच तर आहे.
पूर्व प्राथमिक स्तर- इयत्ता तिसरी ते पाचवी.
तीन वर्ष दुसरा स्तर.
पूर्व माध्यमिक स्तर-इयत्ता सहा ते आठ.
तीन वर्ष तिसरा स्तर.
माध्यमिक स्तर- इयत्ता नववी ते बारावी.
चार वर्षे चौथा स्तर.
म्हणजेच स्तर रचना - ५+३+३+४.
वरील स्तराप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना शिकावे लागणार आहेत.शिक्षकाला अध्यापन करावे लागणार आहे. .
वरील प्रमाणे शैक्षणिक धोरणाप्रमाणे अभ्यासक्रम तयार करण्याचे काम एनसीईआरटीला देण्यात आले असून अभ्यासक्रम तयार करून त्याप्रमाणे पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम सुरू आहेत .
लवकरच नवीन शैक्षणिक धोरण बाबत मूल्यमापन वर चर्चा करणे ही आवश्यक आहे..
मूल्यमापन व परीक्षा पद्धती-
परीक्षा पद्धती बद्दल पालकाच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.
शाळेत वर्ग चाचण्या घेतल्या जातील का?
खुली पुस्तक परीक्षा होईल का?
तोंडी परीक्षा होणार आहे काय?
गटचर्चा होणार आहे काय?
विद्यार्थ्यांची परीक्षा कशी होईल?
सत्र परीक्षा असेल काय?
वार्षिक परीक्षा असेल काय?
नापास विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार का?
मूल्यमापन व परीक्षा पद्धती चे स्वरूप कसे असेल?
नेमके शैक्षणिक धोरण केव्हापासून सुरू होणार आहे?
वरील सर्व बाबींचा विचार करता प्रत्यक्ष नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर क्रमाक्रमाने एकेक मुद्दे समोर येतील प्रथम अंगणवाडीचे शिक्षण पूर्ण होईल. नंतर दुसऱ्या स्तराचे शिक्षण पूर्ण होईल नंतर तिसऱ्या स्तराचे शिक्षण पूर्ण होईल नंतर चौथ्या शिक्षण स्तराचे शिक्षण पूर्ण होईल. माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी या धोरणाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून लवकरच सर्व क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरण सुरू होऊन 2040 ला संपूर्ण भारतीय युवक जगातील महान सर्वोत्कृष्ट नागरिक म्हणून नोकरी न करता व्यवसाय करतील म्हणजेच व्यावसायिक होतील व 2040 ला भारत जगातील एक महासत्ता म्हणून पदार्पण करेल .यात कोणतीही शंका नाही. म्हणूनच नवीन शैक्षणिक धोरणाबाबत या लेखातून काही मुद्दे स्पष्ट केले आहेत. लेखातील हा भाग पहिला असून लेखातील दुसरा भाग लवकरच तयार करण्यात येईल व संपूर्ण मार्गदर्शन आजच्या पिढीला व्हावे म्हणून हा लेख महत्त्वपूर्ण आहे..
सर्व विद्यार्थ्यांच्या आणि उपस्थित शिक्षकांच्या मना त या धोरणाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे अभ्यासक्रम कसा असेल, पुस्तके कसे असतील, अध्यापनाची पद्धत कशी असेल. विद्यार्थ्यांची अध्ययन पद्धती कशी असेल यानुसार शिक्षण क्षेत्रात अत्यंत मोठी खळबळ सुरू आहे.
संबंधित माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लिंक PDF LINK
अधिक माहितीसाठी आमचे खालील इतर लेख आवश्यक वाचा.