ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध |Granth
hech Guru Essay in Marathi
मानवाला म्हणजेच माणसाला पुस्तकाची आवड असणे आवश्यक आहे. जर आवड असेल तर तो व्यक्ती ज्या विषयावर माहिती मिळवायची आहे त्या विषयाचे पुस्तक शोधून नंतर वाचून ज्ञान मिळतो. म्हणूनच असे म्हटले जाते "वाचाल तर वाचाल"
पुस्तकाला आपण गुरुजीचे स्थान दिल्यामुळे ग्रंथ हेच गुरु असल्यामुळे त्याबाबत आपणास असे म्हणता येईल गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा अशीच व्याख्या पूर्वजापासून ऋषीमुनीच्या आश्रमापासून तर आजच्या डिजिटल युगापर्यंत गुरुजी चे स्थान महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच पुस्तकाशिवाय आपण वाचू शकत नाही. कोणत्याही विषयाचे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर आपणास त्या विषयाचे पुस्तक वाचल्याशिवाय ज्ञान मिळणार नाही. सकोल पुस्तकाचे वाचन केल्यानंतर आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही .हे अर्ध सत्य आहे. शाळेत तर आपण शिकताना सर्व विषयाच्या पुस्तकाचा अभ्यास करतो अभ्यास करत असताना चुका झाल्यास गुरुजी आपणास शिक्षा करतात पण घरी बसून तुम्ही पुस्तकाला गुरुचे स्थान दिले व वाचन केले तर कोणत्याही प्रकारची शिक्षा होण्याचे कारण नाही फक्त प्रयत्न करण्याची गरज आहे. आपण असे म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर मिळतो हे खरे आहे. रानटी अवस्थेपासून तर डिजिटल युगापर्यंत जगातील महासत्ता बनवण्यात जगातील प्रत्येक देशाला पुस्तके ज्ञानामुळेच प्रचंड बुद्धीत वाढ होऊन अनेक नवे नवे शोध लागत या स्तरापर्यंत येऊन पोहोचलो आहे. आज जगामध्ये सर्व विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत पण वाचकांची संख्या किती आहे याचेही सर्वेक्षण होण्याची गरज आहे. पुस्तकातून ज्ञान मिळते ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा आपणास प्रचंड ज्ञान प्राप्त करावी लागतात. म्हणूनच आपण आज महत्त्वाच्या विषयाकडे मित्रांनो वळालो आहे आणि तो विषय म्हणजे "ग्रंथ हेच गुरु."भारतीय संस्कृती पासून आज पर्यंत प्रचंड प्रकारच्या ग्रंथ ज्ञानातून वाचन केल्यामुळे आपण समृद्ध बनतो आहोत. पूर्वजांनी सुद्धा ग्रंथाला गुरुच मानले आहे. ग्रंथ ज्ञानसागर होय. या महासागरात उडी घेण्याचे कर्तव्य मित्रांनो आपणास करावे लागेल. बालपणापासून जर पुस्तकाची वाचनाची आवड निर्माण झाली तर भविष्यकाळात तो असंख्य प्रकारची पुस्तके वाचू शकतो व समृद्ध होऊ शकतो हे इतिहासाने सिद्ध केले आहेत. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना भारतीय विचारवंत परदेशात जाऊन शिक्षण घेतले परदेशातील ग्रंथ वाचले लोकशाही विषयी माहिती वाचली व त्या अनुषंगाने भारतात विचाराची क्रांती करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले यामध्ये पुस्तकांचा म्हणजेच ग्रंथांचा वाटा सिंहाचा आहे. परदेशात शिक्षण घेऊन आल्यानंतर विचारवंतांनी समाज सुधारकांनी त्या ज्ञानाच्या साह्याने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलाचा पुरावा उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना. इंग्रजांनी तुरुंगात बंदिस्त केल्यानंतर तेथेही सुद्धा त्यांनी ग्रंथ लिहिले. काळे पाणी. अनेक कविता लिहिल्या.
लोकमान्य टिळक हे मंडळाच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला हेही उदाहरण अत्यंत महत्त्वाचे आहे. पण आपण आज ग्रंथापासून दुरावत आहोत त्यामुळे परत एकदा पुस्तकाकडे मित्रांनो आपणास घेऊन जाण्यासाठी हा लेख लिहिण्यात येत आहे संपूर्ण या लेखाचा अभ्यास करा म्हणजे पुस्तकाचे महत्व आपणास कळेल
1पुस्तका वाचन वेडा
2पुस्तकाची किंमत किती ?
3 वाचलं तर काय फरक पडतं ?
4 आपण भारतीय असाल तर
आपण भारतीय असाल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव ऐकलेच असेल.त्यांना मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल एक पुस्तक बक्षीस मिळालं होतं.ते कृष्णराव केळुसकर या लेखकाने लिहिलेलं.ते होतं बुद्धचरित्र.ते पुस्तक जेव्हा केळुसकरांनी लिहिलं होतं त्या काळात बुद्धावरील पुस्तकं देशात दुर्मिळ होती.ते पुस्तक त्या लहान भिमरावाच्या मनावर एवढा प्रभाव पाडून गेलं की त्यांनी पुढे आपल्या लाखो अनुयायांसह बुद्ध धम्म स्वीकारला आणि या देशाचा इतिहासच बदलला.मातीत गाडल्या गेलेला बुद्ध घराघरात आला.एवढे परिवर्तन एका पुस्तकाने केले.आता तुम्हाला वाटेल की आपण आता केळुसकरांचं पुस्तक वाचूया म्हणजे झालं.आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की त्या पुस्तकाची किंमत किती ? हे पुस्तक तर अभ्यासक्रमाचं पुस्तक नव्हतं.
आपणास छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास, त्यांची गनिमी काव्याची पद्धत माहीत असावी.ही पद्धत पुस्तकांच्या माध्यमातून जगभर गेली.नेताजी सुभाषचंद्र बोसांना जेव्हा इंग्रजांच्या नजरकैदेतून निसटून जर्मनीला जायचं होतं तेव्हा 'आग्ऱ्याहून सुटका' ही गोष्ट त्यांच्यासाठी प्रेरणा देणारी ठरली.त्या पुस्तकाची किंमत किती ?
आपल्या पूर्वेला व्हिएतनाम नावाचा एक देश आहे. त्या देशावर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने हल्ला केला होता.परंतु त्या देशातील सामान्यातला सामान्य माणूस छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांसारखा लढला.जसा शिवाजी महाराजांविरूद्ध लढताना बलाढ्य शक्तीशाली औरंगजेब थकला तसाच व्हिएतनामशी लढताना अमेरिका थकली.माघार घेतली. त्या पुस्तकाची किंमत किती ? चांगली पुस्तकं माणसं घडवतात.देशही घडवतात. परंतु ती केवळ अभ्यासक्रमाची नाही.
आपण अलेक्झांडर कनिंघमबद्दल ऐकले किंवा वाचले आहे का ? तो ब्रिटीश अधिकारी भारतामध्ये पुरातत्व संशोधक होता. त्याने महान चिनी प्रवासी 'ह्यू एन त्संग' याचं पुस्तक वाचलं आणि ते वाचून धरतीच्या पोटात दडवलेला बुद्धाचा अख्खा इतिहास धरतीच्या पोटातून बाहेर आणला.असे लोक आणि अशी शेकडो पुस्तकं आहेत की ज्यांनी जगाचा इतिहास बदलला.कार्ल मार्क्सच्या 'दास कॅपिटल' या ग्रंथाने अर्ध्या जगाचा इतिहास बदलला.
5 कथा,कविता आणि कादंबऱ्या
जगात अनेक कथा,कविता आणि कादंबऱ्या आहेत की ज्यांनी माणसाच्या मनावर हजारो वर्षे संस्कार केले आणि माणसाला माणूस ठेवले. किमान मशीन होण्यापासून वाचवले.कथा कादंबऱ्यांची पुस्तकं माणसाला केवळ ज्ञान देत नाही तर जगण्याचं शहाणपण देतात.संकटप्रसंगी तोंड कसं द्यावं हे गोष्टींची पुस्तकं शिकवतात.पूर्वी पुस्तकं नव्हती तेव्हा घरातील ज्येष्ठ माणसं कठीण परिस्थितीला सामोरं कसं जावं,आपल्या अवतीभवतीची माणसं कशी मूल्यवान असतात हे शिकवायचे.अलीकडे अशा गोष्टी सांगणारे आजी आजोबा नाहीत.किमान ते 'हम दो हमारे दो'च्या घरात नाहीत.तसे संस्कार करणारी घरं आज नाहीत.मुलांवर घरात संस्कार होत नाही आणि बाहेरही होत नाही.गोष्टींची पुस्तकं न वाचणारी उच्चशिक्षित पिढी माणुसकीने वागताना दिसत नाहीत.अलीकडे तर 'अभ्यास कर... अभ्यास कर... होमवर्क कर...९९टक्के मिळव' असा तगादा लावणारे आईबाप दिसतात.ते अभ्यासक्रमाचं शिकतात व शिकवतात.अशा अभ्यासाने मुलांचा बुद्ध्यांक वाढत असेल परंतु भावनांक वाढत नाही.त्यातून संसार मोडतात,घरं तुटतात,थोड्याशा धक्क्यानेही आजची तरूण पिढी आत्महत्येपर्यंत पोहचते.पुस्तकं या मनोबल वाढवणाऱ्या संस्कार शाळा असतात. सर्वस्व गमावणाऱ्यांनाही पुस्तकांची किंमत कळत नाही.खरं म्हणजे चांगल्या पुस्तकांचं मूल्य कोणीच देऊ शकत नाही.तरी लोक प्रश्न विचारतातच 'या पुस्तकाची किंमत किती?' नाही उत्तर देता येत मला.
6 पुस्तकं जगायला शिकवतात
मी हजारो पुस्तकं वाचलीत.केव्हातरी एक लहानशी गोष्ट वाचली होती.ती होती ध्रुव बाळाची.ध्रुव म्हणतो की 'मला असं मला अढळ सिंहासन दे की जिथून मला कोणीच हलवू शकणार नाही.' जिथून मला कुणी हटवू शकत नाही असं काहीतरी मी मिळवलेलं आहे.तो मिळवण्याचा ध्यास आहे.ती लहानपणी वाचलेली कथा आजही माझं मानसिकबळ वाढवते.
आपल्या पृथ्वीच्या उत्तरेला एक तारा आहे.त्याला ध्रुव तारा म्हणतात.पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते.तेव्हा चंद्र, सूर्य आणि ग्रह आपले स्थान बदलतात; परंतु ध्रुव अढळ असतो.कोणतं पुस्तक कोणत्या माणसाचं आयुष्य केव्हा बदलून टाकेल हे सांगता येत नाही.
7 तुम्हीच ठरवा.
पुस्तकं जगायला शिकवतात,माणुसकीनं वागायला शिकवतात आणि एवढेच नव्हे तर कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहायला शिकवतात.
FAQ
1. पुस्तकाला
कशाचे स्थान दिले आहेत?
गुरुचे
स्थान.
2. लोकमान्य
टिळकांनी तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला?
गीता
रहस्य.
3. स्वातंत्र्यवीर
सावरकर तुरुंगात असताना त्यांनी कोणती कादंबरी लिहिली?
पाच
सोनेरी पाने व काळे
पाणी.
4. विद्यार्थ्याने
पुस्तक वाचल्यानंतर त्यावर काय परिणाम होईल?
ज्ञानवृद्धी
वाढेल व समृद्ध विकास
होईल.
5. "भारताची
राज्यघटना" हे पुस्तक कोणी
लिहिले?
डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर.
अधिक
माहितीसाठी आपण आमचे खालील
लेख वाचा.
1. सेवानिवृत्त
शिक्षकांचे शिक्षण शिक्षण मंत्र्यांना पत्र