Type Here to Get Search Results !

हेच गुरु मराठी निबंध हेच गुरु मराठी निबंध |Granth hech Guru Essay in Marathi

 

 ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध |Granth hech Guru Essay in Marathi

 नमस्कार मित्रांनो! आज आपण मराठी या विषयातील" ग्रंथ हेच गुरु हा निबंध "लिहिणार आहोत. खऱ्या अर्थाने पाहिले तर मानवाला प्रचंड ज्ञान देणारे आधुनिक युगातील साधन म्हणजे पुस्तके. पुस्तके वाचल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते.

 ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध (toc)
आजचे डिजिटल युग आहे. या युगा तुम्ही पुस्तक वाचले नाही तर जगू शकणार नाही. या जीवनसागर यात्रेच्या प्रवाहातून बाजूला फेकले जाणार. मित्रांनो आपण पुस्तक वाचणे अत्यंत आवश्यक आहे. गुरुजी आपल्याला शाळेत ज्ञान देतात. त्याच ठिकाणी गुरूच्या ठिकाणी पुस्तक मानले गुरुजीचे स्थान पुस्तकाला दिले आणि वाचन केले तर आपण प्रचंड ज्ञान मिळू शकतो म्हणूनच म्हटले आहे "ग्रंथ हेच गुरु". ग्रंथ हेच गुरु असल्यामुळे ग्रंथ वाचल्या नंतर म्हणजेच पुस्तके वाचल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये प्रचंड  प्रमाणात वाढ झाल्याशिवाय राहत नाही.

मानवाला म्हणजेच माणसाला पुस्तकाची आवड असणे आवश्यक आहेजर आवड असेल तर तो व्यक्ती ज्या विषयावर माहिती मिळवायची आहे त्या विषयाचे पुस्तक शोधून नंतर वाचून ज्ञान मिळतोम्हणूनच असे म्हटले जाते "वाचाल तर वाचाल"


पुस्तकाला आपण गुरुजीचे स्थान दिल्यामुळे ग्रंथ हेच गुरु असल्यामुळे त्याबाबत आपणास असे म्हणता येईल गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा अशीच व्याख्या पूर्वजापासून ऋषीमुनीच्या आश्रमापासून तर आजच्या डिजिटल युगापर्यंत गुरुजी चे स्थान महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच पुस्तकाशिवाय आपण वाचू शकत नाही. कोणत्याही विषयाचे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर आपणास त्या विषयाचे पुस्तक वाचल्याशिवाय ज्ञान मिळणार नाही. सकोल पुस्तकाचे वाचन केल्यानंतर आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही .हे अर्ध सत्य आहे. शाळेत तर आपण शिकताना सर्व विषयाच्या पुस्तकाचा अभ्यास करतो अभ्यास करत असताना चुका झाल्यास गुरुजी आपणास शिक्षा करतात पण घरी बसून तुम्ही पुस्तकाला गुरुचे स्थान दिले वाचन केले तर कोणत्याही प्रकारची शिक्षा होण्याचे कारण नाही फक्त प्रयत्न करण्याची गरज आहे. आपण असे म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर मिळतो हे खरे आहे. रानटी अवस्थेपासून तर डिजिटल युगापर्यंत जगातील महासत्ता बनवण्यात जगातील प्रत्येक देशाला पुस्तके ज्ञानामुळेच प्रचंड बुद्धीत वाढ होऊन अनेक नवे नवे शोध लागत या स्तरापर्यंत येऊन पोहोचलो आहे. आज जगामध्ये सर्व विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत पण वाचकांची संख्या किती आहे याचेही सर्वेक्षण होण्याची गरज आहे. पुस्तकातून ज्ञान मिळते ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा आपणास प्रचंड ज्ञान प्राप्त करावी लागतात. म्हणूनच आपण आज महत्त्वाच्या विषयाकडे मित्रांनो वळालो आहे आणि तो विषय म्हणजे "ग्रंथ हेच गुरु."भारतीय संस्कृती पासून आज पर्यंत प्रचंड प्रकारच्या ग्रंथ ज्ञानातून वाचन केल्यामुळे आपण समृद्ध बनतो आहोत. पूर्वजांनी सुद्धा ग्रंथाला गुरुच मानले आहे. ग्रंथ ज्ञानसागर होय. या महासागरात उडी घेण्याचे कर्तव्य मित्रांनो आपणास करावे लागेल. बालपणापासून जर पुस्तकाची वाचनाची आवड निर्माण झाली तर भविष्यकाळात तो असंख्य प्रकारची पुस्तके वाचू शकतो समृद्ध होऊ शकतो हे इतिहासाने सिद्ध केले आहेत. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना भारतीय विचारवंत परदेशात जाऊन शिक्षण घेतले परदेशातील ग्रंथ वाचले लोकशाही विषयी माहिती वाचली त्या अनुषंगाने भारतात विचाराची क्रांती करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले यामध्ये पुस्तकांचा म्हणजेच ग्रंथांचा वाटा सिंहाचा आहे. परदेशात शिक्षण घेऊन आल्यानंतर विचारवंतांनी समाज सुधारकांनी त्या ज्ञानाच्या साह्याने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलाचा पुरावा उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना. इंग्रजांनी तुरुंगात बंदिस्त केल्यानंतर तेथेही सुद्धा त्यांनी ग्रंथ लिहिले. काळे पाणी. अनेक कविता लिहिल्या.

लोकमान्य टिळक हे मंडळाच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला हेही उदाहरण अत्यंत महत्त्वाचे आहे. पण आपण आज ग्रंथापासून दुरावत आहोत त्यामुळे परत एकदा पुस्तकाकडे मित्रांनो आपणास घेऊन जाण्यासाठी हा लेख लिहिण्यात येत आहे संपूर्ण या लेखाचा अभ्यास करा म्हणजे पुस्तकाचे महत्व आपणास कळेल

 

 1पुस्तका वाचन वेडा


इतिहास काळाचा वेध घेतला असता असे दिसून येते की ,माणूस रानटी अवस्थेपासून तर आजच्या स्थितीपर्यंत सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पुस्तक म्हणून आम्ही त्याला म्हणतो ग्रंथ हेच गुरुपुस्तकातून बरेच काही शिकता येते .अनेक पुस्तके वाचल्यानंतर तसेच अनेक ग्रंथ वाचल्यानंतर आपणास अतिशय आनंद होतोमहत्वपूर्ण माहिती प्राप्त होतेत्यामुळे पुस्तकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .आजच्या नवीन पिढीला " पुस्तकाची "किंमत या माझ्या लेखातून स्पष्ट करत आहे.
 

2पुस्तकाची किंमत किती ?

 

कशाला वाचायचं पुस्तकउगाच पुस्तकावर कशाला पैसे खर्च करायचेवाचता येईल कोणाकडून तरी.नाही वाचली पुस्तकं तर काय फरक पडतो ? अवांतर पुस्तकं खरेदी करणे म्हणजे फालतू खर्च.या पुस्तकाची किंमत किती ?'
 
अलीकडेच फेसबुकवर एक व्हीडिओ मी पाहिलात्यात एक पस्तीस किंवा चाळीशीतील पुरूष आपल्या आईवडिलांना बाईकवर घेऊन येतो.रस्त्यावर बाईक थांबवतो.म्हाताऱ्या आईवडिलांना बाईकवरून उतरायला सांगतो.ते उतरल्यावर तो त्यांच्या कापडाची बॅग  एक बोचकं सडकेच्या कडेला फेकतो.बाईकला कीक मारतो आणि मागे वळून  बघताच निघून जातो.हे असं का घडलं असेल ?
 
काल परवाचीच गोष्ट.चेन्नईच्या आय आय टी मध्ये शिकणारा एक अभ्यासू तरूण आत्महत्या करतो.असं का घडत असावं ? नोकरदार झालेली मुलं ना आईवडिलांशी प्रामाणिक राहातना पत्नीशी.अर्थात सर्वच तसे नसतात.कुठेतरी नुकतंच लग्न झालेल्या मुली प्रियकरासोबत सहज पळून जातात.मग कोर्टाच्या फेऱ्या.आयुष्याची अनेक वर्षे पुन्हा वाया.मानसिक ताण,विमनस्कतानैराश्यअसं का घडत असावं ? किंवा या उलटही घडत असतं.
 
सामान्यतः पालक मुलांच्या शिक्षणासाठी खूप खर्च करतात.करायलाही पाहिजे.परंतु कोणत्या गोष्टींवर ?शाळेची (काॅन्वेंटची)फीस,शाळेची बॅग,शाळेत अभ्यासक्रमाची पुस्तकं,मुलांना खेळायला भारी किंमतीची खेळणी,महागडी सायकल,पुढे बाईक आणि पुढे पुढे महागडा स्मार्टफोन.मुलांना खुश करण्यासाठी किंवा लोकांना दिखाव्यासाठी.तरी सर्व लक्ष असतं विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर.गुणपत्रिका उत्तम तर मम्मी पप्पा खुश.
 

 3 वाचलं तर काय फरक पडतं ?


पूर्वी आईवडिल मुलांची गुणपत्रिका बघत नसत तर वर्तनपत्रिका बघत असत.असं सगळं महागड्या वस्तुंचं जग मुलांच्या हातात दिल्या जातं परंतु अवांतर वाचनासाठी गोष्टींची किंवा अन्य पुस्तकं कधीच घेऊन देत नाही आणि स्वतःही वाचत नाही.कारण तो म्हणजे फालतू खर्च अशी सामान्यतः वाचलं तर काय फरक पडतं ? असते.
 
मी खूप वर्षे पॅसेंजर ट्रेनने प्रवास केला.ट्रेनमध्ये समोसा,आलूबोंडा,भेल,मुंगफली विक्रेते येत असततसेच जनरल नाॅलेजची पुस्तकं विकणारी मुलंही यायची.लोकं दहा रूपयांचा सिंगल वडा सहज विकत घ्यायचे परंतु दहा रूपयांचं पुस्तक विकत घेत नसत.पुढे तो व्यवसाय  चालल्याने त्याच मुलांनी खर्रा विकणं सुरू केलं.तो वीस किंवा तीस रूपयांचा खर्रा अगदी  आनंदाने विकत घेत असत.परंतु दहा रूपयांचं गोष्टींचं किंवा सामान्य ज्ञानाचं पुस्तक विकत घेत नसत.काही लोकांना वाटतं की कशाला पुस्तक विकत घ्यावं ? कधी मिळालंच फुकट तर वाचू.नाहीच वाचलं तर काय फरक पडतं ? काय फरक पडतो ते मी पुढे सांगणारच आहे.
 
तर एकदाची गोष्ट.आम्ही एका हाॅटेलमध्ये जेवायला गेलो होतो.अनेक मित्र होते.उच्चशिक्षीत  चांगलं उत्पन्न कमावणारे.जेवणानंतर आलेलं बील बऱ्यापैकी होतं.जवळपास सहा हजार.मी ते दिलं.परंतु पानांचा विडा घ्यायला गेलो तेव्हा एकाने प्रत्येक विड्याचे तीस रूपये प्रमाणे १८० रूपये सहजस्वेच्छेने  आनंदाने दिले.परंतु  त्याला एकदा तीस रूपये किंमतीचं एक गोष्टींचं पुस्तक घ्यायला सांगितलं.तेव्हा तो म्हणाला की,"आता कोण वाचतं पुस्तकंबायकोलाही वाचायला वेळ मिळत नाही आणि मुलांना शाळेचा अभ्यास असतोच." तेव्हा मला लक्षात आलं की त्यांच्या दृष्टीकोणातून तीस रूपये किमतीचा खाऊन थुंकण्याचा विडा किंवा खर्रा हा तीस रूपयांच्या पुस्तकापेक्षा मूल्यवान असतो.असो.या जगात असा विचार करणारा तो एकटाच नाही.
 
माझं मत असं आहे की मुलामुलींचा केवळ बुद्ध्यांक वाढून उपयोगाचं नाहीआईवडिलांचाही केवळ बुद्ध्यांक वाढणे आवश्यक नाही तर त्यांचा भावनांकही वाढला पाहिजेत्याचा बुद्ध्यांक त्याचे उत्पन्न ठरवू शकतो परंतु त्याचं तुमच्याशी,आसपासच्या लोकांशी,नातेवाईकांशी एकूण वागणं कसं आहे ते भावनांक ठरवतं.अलीकडच्या आईवडिलांचं लक्ष उच्च खर्चाच्या शाळा  मुलांना देण्यात येणाऱ्या महागड्या वस्तू यांच्याकडेच असतं.वस्तूंनी मुलांना मिळणारा आनंद क्षणिक असतो.हे ज्या पालकांना कळत नाही त्यांना त्याची किंमत तात्काळ मोजावी लागत नाही परंतु ते जेव्हा तरूण होतातजेव्हा विवाहित होऊन स्वतःचे संसार थाटतात तेव्हा ती मोजावीच लागते.मग वाट्याला येतं नैराश्य.तेव्हाही पुस्तकांचा आधार घेत नाहीमी आता काय करू ? असे खूप प्रश्न पडतातपरंतु या प्रश्नाचं उत्तर त्यांना सापडत नाहीतेव्हा ते लबाड बाबा अम्मांकडे वळतातपरंतु पुस्तकांकडे नाही.

आपण भारतीय असाल तर

आपण भारतीय असाल तर डॉबाबासाहेब आंबेडकर हे नाव ऐकलेच असेल.त्यांना मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल एक पुस्तक बक्षीस मिळालं होतं.ते कृष्णराव केळुसकर या लेखकाने लिहिलेलं.ते होतं बुद्धचरित्र.ते पुस्तक जेव्हा केळुसकरांनी लिहिलं होतं त्या काळात बुद्धावरील पुस्तकं देशात दुर्मिळ होती.ते पुस्तक त्या लहान भिमरावाच्या मनावर एवढा प्रभाव पाडून गेलं की त्यांनी पुढे आपल्या लाखो अनुयायांसह बुद्ध धम्म स्वीकारला आणि या देशाचा इतिहासच बदलला.मातीत गाडल्या गेलेला बुद्ध घराघरात आला.एवढे परिवर्तन एका पुस्तकाने केले.आता तुम्हाला वाटेल की आपण आता केळुसकरांचं पुस्तक वाचूया म्हणजे झालं.आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की त्या पुस्तकाची किंमत किती ? हे पुस्तक तर अभ्यासक्रमाचं पुस्तक नव्हतं.

 

आपणास छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहासत्यांची गनिमी काव्याची पद्धत माहीत असावी.ही पद्धत पुस्तकांच्या माध्यमातून जगभर गेली.नेताजी सुभाषचंद्र बोसांना जेव्हा इंग्रजांच्या नजरकैदेतून निसटून जर्मनीला जायचं होतं तेव्हा 'आग्ऱ्याहून सुटकाही गोष्ट त्यांच्यासाठी प्रेरणा देणारी ठरली.त्या पुस्तकाची किंमत किती ?

 

आपल्या पूर्वेला व्हिएतनाम नावाचा एक देश आहेत्या देशावर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने हल्ला केला होता.परंतु त्या देशातील सामान्यातला सामान्य माणूस छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांसारखा लढला.जसा शिवाजी महाराजांविरूद्ध लढताना बलाढ्य शक्तीशाली औरंगजेब थकला तसाच व्हिएतनामशी लढताना अमेरिका थकली.माघार घेतलीत्या पुस्तकाची किंमत किती ? चांगली पुस्तकं माणसं घडवतात.देशही घडवतातपरंतु ती केवळ अभ्यासक्रमाची नाही.

 

आपण अलेक्झांडर कनिंघमबद्दल ऐकले किंवा वाचले आहे का ? तो ब्रिटीश अधिकारी भारतामध्ये पुरातत्व संशोधक होतात्याने महान चिनी प्रवासी 'ह्यू एन त्संगयाचं पुस्तक वाचलं आणि ते वाचून धरतीच्या पोटात दडवलेला बुद्धाचा अख्खा इतिहास धरतीच्या पोटातून बाहेर आणला.असे लोक आणि अशी शेकडो पुस्तकं आहेत की ज्यांनी जगाचा इतिहास बदलला.कार्ल मार्क्सच्या 'दास कॅपिटलया ग्रंथाने अर्ध्या जगाचा इतिहास बदलला.

  5 कथा,कविता आणि कादंबऱ्या

जगात अनेक कथा,कविता आणि कादंबऱ्या आहेत की ज्यांनी माणसाच्या मनावर हजारो वर्षे संस्कार केले आणि माणसाला माणूस ठेवलेकिमान मशीन होण्यापासून वाचवले.कथा कादंबऱ्यांची पुस्तकं माणसाला केवळ ज्ञान देत नाही तर जगण्याचं शहाणपण देतात.संकटप्रसंगी तोंड कसं द्यावं हे गोष्टींची पुस्तकं शिकवतात.पूर्वी पुस्तकं नव्हती तेव्हा घरातील ज्येष्ठ माणसं कठीण परिस्थितीला सामोरं कसं जावं,आपल्या अवतीभवतीची माणसं कशी मूल्यवान असतात हे शिकवायचे.अलीकडे अशा गोष्टी सांगणारे आजी आजोबा नाहीत.किमान ते 'हम दो हमारे दो'च्या घरात नाहीत.तसे संस्कार करणारी घरं आज नाहीत.मुलांवर घरात संस्कार होत नाही आणि बाहेरही होत नाही.गोष्टींची पुस्तकं  वाचणारी उच्चशिक्षित पिढी माणुसकीने वागताना दिसत नाहीत.अलीकडे तर 'अभ्यास कर... अभ्यास कर... होमवर्क कर...९९टक्के मिळवअसा तगादा लावणारे आईबाप दिसतात.ते अभ्यासक्रमाचं शिकतात  शिकवतात.अशा अभ्यासाने मुलांचा बुद्ध्यांक वाढत असेल परंतु भावनांक वाढत नाही.त्यातून संसार मोडतात,घरं तुटतात,थोड्याशा धक्क्यानेही आजची तरूण पिढी आत्महत्येपर्यंत पोहचते.पुस्तकं या मनोबल वाढवणाऱ्या संस्कार शाळा असतातसर्वस्व गमावणाऱ्यांनाही पुस्तकांची किंमत कळत नाही.खरं म्हणजे चांगल्या पुस्तकांचं मूल्य कोणीच देऊ शकत नाही.तरी लोक प्रश्न विचारतातच 'या पुस्तकाची किंमत किती?' नाही उत्तर देता येत मला.

पुस्तकं जगायला शिकवतात

मी हजारो पुस्तकं वाचलीत.केव्हातरी एक लहानशी गोष्ट वाचली होती.ती होती ध्रुव बाळाची.ध्रुव म्हणतो की 'मला असं मला अढळ सिंहासन दे की जिथून मला कोणीच हलवू शकणार नाही.' जिथून मला कुणी हटवू शकत नाही असं काहीतरी मी मिळवलेलं आहे.तो मिळवण्याचा ध्यास आहे.ती लहानपणी वाचलेली  कथा आजही माझं मानसिक वाढवते.

 

आपल्या पृथ्वीच्या उत्तरेला एक तारा आहे.त्याला ध्रुव तारा म्हणतात.पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते.तेव्हा चंद्रसूर्य आणि ग्रह आपले स्थान बदलतातपरंतु ध्रुव अढळ असतो.कोणतं पुस्तक कोणत्या माणसाचं आयुष्य केव्हा बदलून टाकेल हे सांगता येत नाही.

तुम्हीच ठरवा.

पुस्तकं जगायला शिकवतात,माणुसकीनं वागायला शिकवतात आणि एवढेच नव्हे तर कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहायला शिकवतात.

 

FAQ

 

1. पुस्तकाला कशाचे स्थान दिले आहेत?

गुरुचे स्थान.

 

2. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला?

गीता रहस्य.

 

 

3. स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुंगात असताना त्यांनी कोणती कादंबरी लिहिली?

पाच सोनेरी पाने काळे पाणी.

 

 

4. विद्यार्थ्याने पुस्तक वाचल्यानंतर त्यावर काय परिणाम होईल?

 

ज्ञानवृद्धी वाढेल समृद्ध विकास होईल.

 

5. "भारताची राज्यघटना" हे पुस्तक कोणी लिहिले?

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

 

अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख वाचा.

 

1. सेवानिवृत्त शिक्षकांचे शिक्षण शिक्षण मंत्र्यांना पत्र

 

2. पालकांना सूचना.

 

 

 

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation